कृषि उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी सदाअग्रेसर सभापती भाऊराव पाटील राष्ट्रीय शेतकरी दिना निमित्त शेतकऱ्यांचा सत्कार

संग्रामपुर [प्रतिनिधी] शेतीमालाच्या खरेदी विक्रीसाठी योग्य सुविधा योग्य भाव शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण शेतकऱ्यांची फसवणुक होणार नाही याची काळजी घेणारी तसेच योग्य बाजार भाव मिळवुन देणारी शेतकऱ्यांचे शेतमालाचे अचुक मोजमाप करणारी शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषि उत्पन्न बाजार समिती सदाअग्रेसर असल्याचे प्रतिपादन सभापती भाऊराव पाटील अवचार यांनी राष्ट्रीय शेतकरी दिना निमित्त वरवट बकाल उपबाजार हभी भाव केंन्द्रावर आयोजीत जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमा प्रसंगी केले कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उपबाजार वरवट बकाल येथील राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधुन शासकीय सोयाबीन हमी भाव केंन्द्रावर सभापती भाऊराव पाटील , उपसभापती संजीव इंगळे यांच्या हस्ते सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा शेला टोपी पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी भाजपा माजी तालुकाध्यक्ष लोकेश राठी खविसं सुरेश मुरुख , कृउबास सचिव पंकज मारोडे , सोयाबीन खरेदी केंन्द्र प्रमुख संदिप माटे , एस एम टिकार , एम ए गोतमारे , सुधीर चोपडे सह हमाल शेतकरी बांधव उपस्थित होते



