विशेष लेखशिक्षण

अधिकची अपेक्षा दुःखाचे कारण तर परोपकार व पुण्याची शिदोरी मृत्यू नंतरही तुमच्या सोबत जाणार आहे ह भ प आगलावे 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] ईश्वर कृपेने जेवढ आहे त्यात समाधानी रहा तुमच्या असलेल्या त्या सर्व गोष्टीमध्ये सुख मानले पाहिजे. मात्र माणूस अधिकची अपेक्षा करतो आणि तो दुखाला आमंत्रित करतो. भगवान शिवाने डोक्यावरच्या जटांना आपला मुकुट बनवला . कपाळावर द्वितीया  चंद्र लावला . लहाना स मोठ्याने सामावून घेतले पाहिजे हा मोठा संदेश यातून मिळतो. अंगी प्रचंड  विनाशाची शक्ती असूनहीं शिव आपल्याला संयम सुद्धा शिकवतात.  संसार सुखी होण्यासाठी डोकं शांत ठेवा डोक्यावर बर्फ ठेवा आणि बोलण्यात साखर ठेवा. पैसा पैसा जप करू नका. खाली हात आलेले आहात पण खाली हातात जायचं नाही. काहीतरी  घेऊनच जाणार. ज्याप्रमाणे एका देशाचे चलन दुसऱ्या देशात चालत नाही .त्याचप्रमाणे  भूतलावरचं चलन दुसऱ्या लोकात चालत नाही. चलन बदलावे लागते या ठिकाणी पुण्य आणि परोपकार याची शिदोरी बांधा ती शिदोरी सोबत ठेवा ही पुण्याची शिदोरी तुमच्या सोबत चालणार आहे ही कन्व्हर्ट होणार.  कितीही श्रीमंत माणूस असला तरी तो मृत्यूवर विजय मिळू शकत नाही इतकच काय रोज उगवलेला सूर्य रोज बुडतोच किती दिवस जगला याला महत्त्व नाही कसा जगला याला महत्त्व आहे .नदी झाडे वेली हा निसर्ग इतरांसाठी जगतो .तसं माणसांना परोपकारी जगलं पाहिजे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती याप्रमाणे जगाचे  कल्याण करायचे असेल तर सत्संग केला पाहिजे .असे हरिभक्त परायण आगलावे महाराजांनी शिवतीर्थावरून संबोधित करताना सांगितले. या धार्मिक समाजप्रबोधन कार्यक्रम स्थळी पातुर्डा पंचक्रोशीतील बहुसंख्यांक भावीक भक्तांची उपस्थित राहत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!