जिल्हा वार्ता
जमनादासजी उपाख्य भाऊ गांधी यांचे निधन

संग्रामपूर [प्रतिनिधी ] तालुक्यातील वानखेड येथील सामाजिक कार्यकर्ते जमनादासजी उपाख्या भाऊ गांधी यांचे अकोला येथील ओझोन रुग्णालयात उपचार दरम्यान १४ सप्टेंबरच्या रात्री निधन झाले. लहान मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण त्यांना आदराने ‘भाऊ’ म्हणुन संबोधीत होते सन १९८० च्या सुमारास वरवट बकाल येथे हार्डवेअर सुरु केल्या नंतर या परिसराला गांधी मार्केट म्हणुन ओळख मिळाली त्यांच्या निधनाची वार्ता समजताच वरवट बकाल येथील गांधी मार्केट मधील सर्व दुकानदार, व्यापाऱ्यांनी दुकानें बंद ठेवुन शोक व्यक्त करण्यात आला वानखेड येथे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात भाऊंना’ अखेरचा निरोप दिला त्यांच्या पश्चात भला मोठा परिवार आहे



